Posts

मुंबई पोलिसांवर आरोप करणारे आता बिळात लपून बसलेत का ? - अनिल देशमुख

Image
 अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र मधील बऱ्याच लोकांनी मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले होते. याच संदर्भाचा धागा धरत आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांनी त्याच लोकांना चिमटे काढून त्याची नाळ उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेशी जोडली आहे. हाथरस येथील घटना हि अमानवीय घटना असून पोलिसांपेक्षा काही विकृत मानसिक वृत्तीच्या लोकांमुळे अश्या घटना घडत असतात हि गोष्ट गृहमंत्र्यांनी लक्षात घेतली पाहिजे.  गृहमंत्री ट्विटर वर या संधर्भात अश्या पद्धतीने बोलले आहेत -  " महाराष्ट्र पोलीस व राज्य सरकारवर आरोप करणारे आता बिळात लपून बसले आहेत. #उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारांचा साधा निषेध सुद्धा यांनी केला नाही.'बेटी बचाओ, बेटी पढाओ' च्या नावाखाली सत्तेत आलेले हे लोक 'बेटी जलाओ' च समर्थन करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. #युपी_में_जंगलराज "  खरेतर अश्या प्रकारच्या या आधी हि महाराष्ट्रामध्येहि घडल्या आहेत. आणि या रोखण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे.